Friday, November 15, 2013

ये रे घना ..

मित्रहो ,
आज थोडे बोलूया, पण काय ? सतत वाढत वाढत बकाल होत जाणाऱया मुंबई बद्दल? तुडुंब भरून पसरत जाणारया गर्दीबद्दल ? आस्मानाला भिडणारया पेट्रोल ,डिझेलच्या भावाबद्दल की 'Globalization" च्या दुनियेत हरवत जाणारया नात्यांबद्दल ? नको "its now a part of so called Life ,isn't it ?" .आज जरा भटकून येऊ , अजूनही पावसाच्या काही सरी रेंगाळत् आहेत."आषाढस्य प्रथमदिवसे..." .आठवणी अजूनही ताज्या आहेत.मनातला पाऊस अजूनही थोडा वाजतोय.पण या भटकंतीची एक "condition" मात्र आहे.तिथे नुसतच नाही जायच.तुम्हाला तोंडात बनारसी पान कोंबावे लागेल ,अत्तरांचा सुगंध शिंपून घेण्याची ,हातात गजरा माळण्याची तयारी करावी लागेल किंवा माळून घ्यावा लागेल. .हृदयावर झटके सोसण्याचीही तयारी हवी.चला तर मग. Lets Go.................

उन्मेष ज्यांच्या यौवनाचा ,काहीच ना झाला कमी
प्यायले जे खूप .ज्यांना वाटे,परी झाली कमी
असेल ही फक्त ,त्यांच्याचसाठी "शायरी"
सांगतो इतरांस ,"बाबा , वाचा सुखे "गीताश्वरी"

तो पहा दूरवर एक घोंगवणारा आवाज येतोय .ऐकू येतय एक झकास दिलखेच गाण
 "आला आला वारा संगे ,पावसाच्या धारा 
पाठवणी करा ,सया निघाल्या सासूरा ...".

"हा खेळ सावल्यांचा"  मधल् हे गाण ज्यांना ठाउक असेल त्याना जाणवेल पावसाचे कोसळणे. हा पाऊसही फार मस्तीखोर असतो कधी कधी .कारण याच्या  तर्हा  काही औरच असतात. कशा ? ह्या अशा ...........

जाणतो मी पावसाच्या जीव घेण्याच्या तर्हा
भिजवतो त्यानाच ज्यांचा मक्ख असतो चेहरा
समोरुनी जातात जेथे वसंतसेनांचे जथे
दुष्ट हा पाऊस तेव्हा जवळही नसतो कुठे

पण कधी कधी मात्र हाच पाऊस एक वरदान म्हणून समोर येतो .तुमच्या नजरेला अगदी तृप्त करतो। …
टाळण्यासाठी मला ती पाठमोरी जाहली ,
काय सांगू, ती ,वर्षेत होती नाह्ली !
गाठ चोळीची कसाया हात मागे गुंतले
त्याचवेळी पावसाने चिंब तिजला भिजविले
हासला निर्लज्ज वरुनि ,ती ही मग रागावली
रागावली ती हे खरे, पण लाजूनी रागावली
भासला कमनीय बांध्याचा  जलद की पातला
निथळवीत पाण्यास जेव्हा देह तिचा वाकला
पावसा , अरेतुझे आभार मी मानू कसे ?
सांग, लघडत्या फळाचे भार मी साहू कसे ?
 
मस्तीतला पाऊस ,बेधुंद वारा आणि समोर ती , मग काय ? ....
भिजण्याची हौस मजला, भिजलो असा कित्येकदा
भिजवणेही प्रिय मजला, मी भिजवले कित्येकदा
इतुकेच की एकाच वेळी एक मजला आवडे
ओलेती तिजला बघावे आपण राहुनी कोरडे 
होते असे भलतेच काही वर्षाऋतुमध्ये बघा
भलतेच कुणी असूनही, भलते घडून जाते बघा
इतक्याचसाठी लाविला ना, हात ओलेत्या तिला
नुसत्या हवेतून मजला झटका परंतु लागला 

पुढे काय ? ......
मी म्हणालो "भिज" ,ती "ना म्हणे भिजेन मी "
मी म्हणालो "भिजू नको" ती म्हणे ,"भिजेन मी"
मी म्हणालो, "भिज तू, वा भिजू नको , लक्षात घे
का राहीले काही असे जे पाहीले नाहीच मी ? 
मित्रहो , आता थोडे वेगळे वळण लागेल .थोडी विश्रांती घेऊ.पण, एक लक्षात असू देत ,

शायरी नुसतीच नाही ,गावया आलो इथे
कोण्यातरी जिंदादीलांच्या दर्शना आलो इथे
दोस्त हो ,मैफिल अपुली रंगण्या जर का हवी
नुसते नको सौजन्य ,तुमची जिंदादिली हवी


सौजन्य -
श्री. भाऊसाहेब पाटणकर.