इतकं रामायण ऐकून वर विचारतोस 'सीता रामाची कोण?'
वर वर पाहता ही म्हण तशी अडाण्यांची टिंगल करणारी.
पण तस पाहीलं तर फार मोठा अर्थ आहे त्यात.
वर वर पाहता ही म्हण तशी अडाण्यांची टिंगल करणारी.
पण तस पाहीलं तर फार मोठा अर्थ आहे त्यात.
पृथ्वीच्या पोटातल्या लेकरांना आई-बाप असतात कुठे ?
मातीच त्यांच जन्मस्थान नि मृत्यूस्थान.
अशोकवनात रामाची मुद्रिका स्वीकारताना सीता हनुमानाला विचारते "राम कसा आहे?"
मारूती म्हणतो "तो सुखरूप आहे पण सुखी नाही"
लगेच सीता म्हणते "वानरा ,हे तू विषाने भरलेले अमृतच देतो आहेस मला.
रामाच मन माझ्याशिवाय अन्य कुणावरही नाही नि तो दु:खी आहे.हेच ते विषाने भरलेले अमृत."
वियोगिनी सीता दु:खी आहे.रामासाठी झुरते आहे.
पण तरी रामात विरघळलेली नाही.रामच सीतामय झाला आहे.
वेडा होऊन वृक्षलतांना तिचा ठावठीकाणा विचारतो आहे!
पुढे जेव्हा सीता भूमीत गडप झाली ,तेव्हा राम हळहळला.दीन झाला.
सीता क्रृद्ध झाली नाही.दीन तर नाहीच नाही.
एका मर्यादेनंतर अस्तित्वाला शोभा नाही हे तिनं ओळखल आणि दैवाने तिला साथ दिली.
आपल प्रेम मनात भरून ,रामाकडे बघत ती रामासमोर भूमीच्या उदरात नाहीशी झाली.
मीलनापेक्षा प्रेमाने भरलेला विरहच तिने सुशोभित केला.
रामाची पत्नी रामाची राहीली नाही.भूमीची मुलगी भुमिमय झाली.ती राममय झाली नाही.
खरचं आहे , "सीता रामाची कोण होती?"
'तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला ।
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला ।।
No comments:
Post a Comment