हे राजन्,
प्रश्न अस्तित्वाचा नाही.ते आज आहे उद्या नसेल.प्रश्न आहे तो लौकीकावर असलेल्या पारलौकीकाच्या पडछायेचा.
युगानुयुगे माणसाला भेडसावणा-या पण कधीच हाती न आलेल्या कोड्याचा.
वेदना समोर उभी ठाकली आणि माणसाच्या मनात 'परमेश्वर' जन्मला.
तो परमदयाळू आहे तो मला सर्व वेदनांपासून वाचवील अशी तारणहार प्रतिमा त्याने बनवली
आणि हा मनःबुद्धीसंस्कार पिढ्यानपिढ्या अगणित मनांवर कोरला गेला ,पुढेही राहील.
असंख्य चेतन-अचेतन वस्तुमात्र रोज या ना त्या कारणाने वेदनाव्यथित होत असताना ,
हे देवा माझं भल कर (मनाने चांगले असतील) तर इतरांचही भलं कर
अस मागण मानण्यातील निर्रथकता कधीच लक्षात न येणे इतकी बधिरता आणण्याचे सामर्थ्य याच 'परमेश्वरात' आहे.
"आभाळ झिरपते भरलेल्या माठात ।
अन् निळा माठ बघ भरला आभाळात ।।
आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे ।
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे ।।"
No comments:
Post a Comment