Tuesday, June 21, 2016

मनात

हे राजन् ,
असण्यामध्ये सगळेच असतात पण नसण्यामध्ये असण्यालासुद्धा एक अर्थपूर्ण आशय असतो.
कांद्याची एक एक पाकळी सोडवता सोडवता शेवटी काय उरते? 

"उकल" ,नसूनही असण्याची !

कधी कधी आकाश भव्य वाटते , पाणी चवदार लागते , तोच तोच स्पर्श नवा वाटतो , 
तिच ती सरगम एक नवी समज देउन जाते . 
हे असं का घडतं कारण नाविन्य वस्तुत नसते ,असण्यात नसते.
ते असते "मनात".
आणि मनाला आजवर कुणीच पाहीलेलं नाही.....

Monday, June 6, 2016

गुलमोहर

आपल्याच दु:खात बुडून जाण्यापेक्षा थोडीशीच ,पण दुस-यांची जाण ठेवली तर?
कटू शब्दांचे बाण सुटायच्या आधी थोडासाचं पण संयम दाखवला तर?
एक साधासा गुलमोहर ,तोही मनासारखा बहरायची वाट पाहावी लागते.
नाही बहरला ,कोसळला,तरी आपण कोसळायच नसतं.तोल सुटू द्यायचा नसतो.
स्वतःच्या 'मी' पणात एवढं आत्मकेंद्रीत व्हायचं नसतं...

हसू नको ,मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे.

"तु जिथे बघशील जे जे ,मी तुला दिसणार ते ते
तू मला ठेवू नको मांडून देव्हा-यात एका"