हे राजन् ,
असण्यामध्ये सगळेच असतात पण नसण्यामध्ये असण्यालासुद्धा एक अर्थपूर्ण आशय असतो.
कांद्याची एक एक पाकळी सोडवता सोडवता शेवटी काय उरते?
"उकल" ,नसूनही असण्याची !
कधी कधी आकाश भव्य वाटते , पाणी चवदार लागते , तोच तोच स्पर्श नवा वाटतो ,
तिच ती सरगम एक नवी समज देउन जाते .
हे असं का घडतं कारण नाविन्य वस्तुत नसते ,असण्यात नसते.
ते असते "मनात".
आणि मनाला आजवर कुणीच पाहीलेलं नाही.....