पंढरीची वारी , म्हणाव तर परंपरा
,म्हणाव तर श्रद्धा ,म्हणाव तर भक्ती.आज या वारीत केवळ वारकरीच नव्हे तर
सर्व थरातील लोक सामील झालेले दिसतात.त्यात ज्याप्रमाणे अशिक्षित गावाकडचा
समाज असतो त्याचप्रमाणे सुशिक्षित ,पदवीधर लोक सुद्धा सामील झालेले दिसतात
.कदाचित यातून सामाजिक एकात्मतेची भावना दिसत असेल ,तरुण मंडळींचा "फिटनेस
फंडा"सुद्धा असू शकेल ,राजकारण्यांची (पापभिरु?) वृत्ती तर वर्तमान
पत्रातून
येतच असते .पण या सर्वांमधून एक अतिशय नाजुकसा ,निरागस ,भाबडा भाव मात्र वर
वर पाहणाराच्या नजरेतुन निसटून जातो .हा भाव कोणता याचे उत्तर सापडते ते
वारीत वर्षानुवर्षे येणारया ग्रामीण ,खेडवळ स्त्री-पुरुषयांत .दोन-तीन
महिने गावोगावी थांबत थांबत ही मंडळी ज्ञानोबा- माउली- तुकाराम चा गजर
करत चन्द्रभागेच्यातीरी जमतात .विट्ठल मूर्तीचे दर्शन तर दुरापास्त असते
तरीही चार चार किलोमीटर रांगेत उभी राहतात .काहीजण नुसतेच मंदिराच्या
कळसाचे दर्शन घेउन परततात .आषाढी कर्तिकेतला विट्ठल हा देव
नसतोच तो असतो एक जिवलग,सखा , "बॉय फ्रेंड " म्हणा ना .डोक्यावर तुळशीचे
रोप डोक्यावर घेऊन वारीतल्या बायका जातात ते ह्या "बॉय फ्रेंड" ला भेटायला .
तुळशी बाईशी त्यांची अशी गम्मत चाललेली असावी -"तुळशी बाई ग ,तुळशी बाई ..अस कस तुझ जिन? वरसा-वरसाला ,पांडुरंगाशी लगीन ?"
पांडुरंगाला त्या विचारत असतील -"पांडुरंगा सांग तुझ जनीशी काय नात ?"
अणि पांडुरग उत्तर देत असेल-" कुणी पाखरू काल राती वस्तीला आल हूत"
जनी पण काय कमी नाही ती तर सरळच म्हणते -"पांडुरंगा कमरेवर का हात बुवा ? पितांबर सुटलाय वाटत ?"
मीराबाई ,सखुबाई , बहिणाबाई सारयानाच या जिवलगाला भेटण्याची ओढ लागलेली
होती अगदी आपल्या नवरोबांना न जुमानता!.
आपल्या
संस्कृतीत बहुतेक सर्वच
देवांच्या हातात काही ना काही शस्त्र हे आहेच.शंकारकडे त्रिशूळ ,
नारायणाकड़े
चक्र, मारुती कडे गदा ,रामाकडे धनुष्य तर गणपतीकडे परशू पण हा विट्ठल मात्र
उभा आहे तो
नुसताच कमरेवर हात ठेऊन .जेवढी ओढ़ त्याच्या प्रियाधरांना आहे तेवढीच याला
सुद्धा म्हणूनच येथल्या प्रत्येक संताने विट्ठालाशी संबंध जोडला तो
एक बाई म्हणूनच.तुकाराम महाराज म्हणतात "कन्या सासुर्यशी जाई,मागे परतोनी पाही "
.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "तुम्ही गातसा सुस्वरे ,एयकोनि द्यावे उत्तरे ,
कोकिळे वर्जावे तुम्ही बाईयांनो ".हीच तर "मधुरा भक्ती".कोण्या एका
महाराजांनी म्हणे अशाच "मधुरा भक्तीत " व्रत म्हणून हातात बांगड्या आणि अंगात पातळ नेसून विट्ठ्लाला भजले होते .असो.
राधेची तर वार्ताच नको .अनया गवळी (राधेचा नवरा)बाहेर गेला असताना
राधा बाळ मुकुंदाला घरी आणते त्याला स्तनपान करते .त्याचे ते मेघश्यामल रूप
पाहून
त्याच्यावर भाळते सुद्धा.तिचा रतीभाव पाहून कृष्ण तरुण रूप धारण करतो आणि
तितक्यात अनया गवळी येतो।राधेची त्रेधातिरपीट होते ती कृष्णाला हात जोडते .कृष्ण मिश्किल पणे हसत परत बाळ होतो.ग्रेस ने एका
कवितेत म्हटले आहे "राधेच्या पदराखाली तो कृष्ण नागडा होता " .आपण उगाच
ग्रेसला दुर्बोध म्हणतो .कृष्णाच्या नागडेपणाचे हे रहस्य कदाचित या ओळीत
अपेक्षित असेल.
तर असा हा विट्ठल आषाढात अशा अनेक मायाबायंशी रमलेला असतो .अशी प्रेमाची भेट घेऊन जेव्हा त्या घरी परत येतात तेव्हा कुणी विचारलेच तर सांगतात - "पंढरीला जाउन काय केल? चंद्रभागेमधे देहभान उजळल" .किती उद्दात्त भावना !देह ही कुडी,
सावळे चैतन्य परब्रह्म त्यात नसेल तर त्याचा काय उपयोग ?पण तोपर्यंत तरी
हे भांड निर्मळ ठेवायला हव.!
इरावती बाईंना त्यांचा जावई जेव्हा विचारतो
की काय आलीस का तुझ्या "बॉय फ्रेंडला" भेटून तेव्हा ही विदुषी हसून लगेच
म्हणते "होय रे बाबा"
No comments:
Post a Comment