Tuesday, September 22, 2015

चेहरा

प्रत्येक चेह-यात एक आभा असते ,मनातल्या किरणांची -अभाव-विभावांची ,कट-विकटांची ,सुख-दु:खांची.
आणि तोच तर खरा चेहरा असतो.एरवी माणसे मुखवटे पांघरून स्वतःलाच फसवत असतात.
पण काय नवल? माणसाला दोन अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही ,चेह-याचे नि पाठीचे.
म्हणजे माणूस स्वत:पुरता बिनचेह-याचा असतो.अनुभवाने अलिप्त असतो.
आरश्यात जरी तो पाहता आला तरीही ते प्रतिबिंबच असते आणि काठावर पाणी पिताना सिंह जसा त्याला दुसरा सिंह समजून त्यावर झडप घालून स्वतःचीच फसवणूक करतो तेच आपणही करत असतो.
फरक एवढाच की श्वापद निष्पाप असते आणि आपण हुशार असतो.
या आत्मप्रतिबिंबाच्या मोहातून बाहेर पडणारे फारच विरळे.असो.
एखाद्या ज्ञानेश्वरालाच हे कसे काय गवसते ?-

"दर्पणी पहाता रूप न दिसे वो आपुले ।
बाप रखुमादेवीवरू मज ऐसे केले ।।"

No comments: