Wednesday, August 3, 2016

कालाय तस्मै नमः


हे राजन् ,

जीवनात दु:खाचे अपरिहार्य अस्तित्व का असावे याचे कारण कधीच सापडत नाही. 
पण त्या दु:खाला कसे तोंड द्यावे ते काऴ शिकवित असतो.
माणूस मात्र जीवनाकडून हिशेब मागत असतो.
जसे काय जीवन म्हणजे गणिताचा पेपर किंवा भूमितीचा सिद्धांत.
मला वाटते ,असल्या समस्यांची उत्तरे शास्त्रे देऊ शकत नाहीत.
पण जी शक्ती गणितात नसते ती कलेत असते.
कला ,तत्वज्ञान आणि अनुभव यांच्या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले 
अद् भूत रसायन म्हणूनच जीवनाला सामोरे गेले पाहीजे.
मग सारी कोडी सुटतात.त्याचे स्वरूप हे ज्याचे-त्याचे वेगळे असू शकते. 


"कालो: गुरू । कालाय तस्मै नमः।।"


"नेहमीच नाही ,पण कधी असेही घडते
करकरीत वास्तवा जरीकिनार जडते
नेहमीच नाही ,पण कधीतरी असे होते
माती पदरी भरता रत्न हातासं येते"

No comments: