Monday, November 28, 2016

मोर नाचरा हवा

हे राजन्,
फरक असावा पण फारकत असु नये.
एक वेळ कापले तरी चालते कारण ते पुन्हा शिवता येते 
पण तोडलेले कधी जोडता येत नाही हे ध्यानात असु द्यावे.
माणसं वास्तवता आणि दैवत्व , चैतन्य आणि शरीर यात 
नेहमीच अंतर मानीत आली आहेत.
तत्वार्थ देखणेपण जोपर्यंत नजरेत उतरत नाही तोपर्यंत हे उमजणे कठीण आहे 
की तसे अंतर नाही.चिखलाच्या अस्तित्वाशिवाय कमळाचा प्रारंभ संभव आहे ? 
विटाळाशिवाय सृजन-संभव आहे? 
आपले पूर्वज ज्ञानी होते तितकेच रसिकही होते.
म्हणूनच पार्वतीच्या अंगावरच्या मळातून गजाननाची विमलमूर्ती निर्माण होऊ शकली.
समर्थांनी ती राजरंगी नाचवली.
आज आईला निरोप देताना काय मागायचे ?
 तिच्या अश्रूंचा अमृतानुभव हवा असेल तर एवढेच म्हणायचे -

"पदरावरती जरतारीचा
मोर नाचरा हवा
गं आई मला ,नेसवं
शालू नवा"

No comments: