हे राजन्,
फरक असावा पण फारकत असु नये.
एक वेळ कापले तरी चालते कारण ते पुन्हा शिवता येते
पण तोडलेले कधी जोडता येत नाही हे ध्यानात असु द्यावे.
माणसं वास्तवता आणि दैवत्व , चैतन्य आणि शरीर यात
नेहमीच अंतर मानीत आली आहेत.
तत्वार्थ देखणेपण जोपर्यंत नजरेत उतरत नाही तोपर्यंत हे उमजणे कठीण आहे
की तसे अंतर नाही.चिखलाच्या अस्तित्वाशिवाय कमळाचा प्रारंभ संभव आहे ?
विटाळाशिवाय सृजन-संभव आहे?
आपले पूर्वज ज्ञानी होते तितकेच रसिकही होते.
म्हणूनच पार्वतीच्या अंगावरच्या मळातून गजाननाची विमलमूर्ती निर्माण होऊ शकली.
समर्थांनी ती राजरंगी नाचवली.
आज आईला निरोप देताना काय मागायचे ?
तिच्या अश्रूंचा अमृतानुभव हवा असेल तर एवढेच म्हणायचे -
"पदरावरती जरतारीचा
मोर नाचरा हवा
गं आई मला ,नेसवं
शालू नवा"
No comments:
Post a Comment