Monday, November 28, 2016

प्राणातले ऊन


हे राजन् ,
लोक दिवसरात्र भजनं म्हणतात ,धूप आरत्या ,यज्ञ ,संकल्प काय काय म्हणून करतात.
पण मरण हे जीवनाचच एक अविभाज्य अंग आहे ," जन्म आणि मृत्यू" 
हे दोन्ही मिळूनच जीवन बनत या गोष्टीचा स्वीकार नाही ! 
खेदाची बाब आहे पण भ्रमाचा हा भोपळा फुटेस्तोवर 99% लोक शरीराच्या या सामान्य 
धर्माचा स्वीकार करू शकत नाहीत.
आपण म्हणतो ,जाऊ नको तिकडं ,कोणीतरी मेलं आहे ,अशुभ आहे.
अरे ,मरणात काय अशुभ आहे? जन्म तो शुभ आणि मरणं अशुभ? 
अशुभ असलं तर दोन्ही अशुभ होणार.शुभं असलं तर दोन्ही शुभ होणार.मुळातच चूक आहे.
मृत्यूचा स्वीकार करण्याच साहस लहानपणापासूनच मुलांना शिकवलं पाहीजे.
मृत्यू आला म्हणजे जीवनाचा अंत झाला असं समजणं चूक आहे.
जन्माबरोबर जीवन सुरू होत नाही आणि मृत्यूबरोबर त्याचा अंतही होत नाही !

"किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे ?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे ..."

No comments: